Skip to main content

पाऊस आला पाऊस आला

आला रे आला पाऊस

पाऊस आला पाऊस आला
झाला आनंद आम्हा सर्वाना।
सर्विकडे पाणीच पाणीच
झाला जास्त आनंद शेतकर्‍यांना।।

भरले धरणे भरले तलावं
ओसंडून वाहू लागल्या नदी नाले।
गायीगूरांना झाला चारा
सर्वजण आनंदी झाले।।

शेतरान झाले हिरवे हिरवे
जसा पडला हिरवा सडा।
पशूपक्षी लागले कामाला
त्यांच्या कामात नको खोडा।।

संचारला उत्साह सर्वामध्ये
प्रत्येकाची चालली धावपळ।
कुणाजवळ नाही वेळ उरला
पावसाने केली सर्वाची पळापळ।।

पाऊस राजा अशीच कृपा राहू दे
भरू दे शेतकर्‍यांचे धनधान्याने घर।
येवू दे त्यांच्या घरी सुखसमृध्दी
आण त्यांची गाडी प्रगतीपथावर।।

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...