Skip to main content

काय करावे

आज काय करावे
काहीच समजेना।
असं कसं झालं
काहीच सूचेना।।

बरेच वर्ष चालले
माझ्या आयुष्यातून।
नाही ठेवला जमाखर्च
डायरीत लिहून।।

जूने मित्र जावून नवीन आले
जमली त्यांच्याशी मैत्री।
सापडेल माझा आनंद
आहे पक्की खात्री।।

तोच सूर्य अन तोच चंद्र
तीच रात्र अन तोच दिवस।
तेच सूख अन तेच दु;ख
बघून होते मन उदास।।

तोच पावसाळा अन तोच हिवाळा
तीच गरमी अन तीच थंडी।
तेच मटन अन तेच चिकन
तीच कोंबडी अन तीच अंडी।।

आशा आहे येईल नवीन पहाट
करतील पक्षी किलबिल।
येईल नवा उत्साह
जाईल सारी मरगळ।।
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...