Skip to main content

जीवन

जीवन

जन्म कुठे व कसा घ्यायचा हे आपल्या हातात नाही व तसेच मरण कधी कुठे व कसं हे ही आपल्या हातात नाही  मग मधील जेदिवस असतात त्यालाच जीवन म्हणतात व ह्या जीवनात बालपणीचा काळ तर असाच हसत हसत निघून जातो त्या काळात तर खेळण्या व खाण्या व्यतिरिक्त आपण काहीच करत नाही तेवढी अक्कल आलेली नसते .शहाणपणा आलेला नसतो .बरेच वर्ष शिक्षण घेण्यामध्येच जातात .काही वर्ष नोकरी शोधण्यात जातात .मग लग्न करण्यासाठी काही वर्ष जातात .काही वर्ष घर गाडी भावंडे यांना सावरण्यात जातात .काही वर्ष काहींच्या आजारपणात जातात .मग बायको व मुलांच्या मागे बरीच वर्ष जातात .निम्मे आयुष्य तर झोपेतच जाते .काही वर्ष नातेवाईक शेजारी यांच्या भांडणात जाते .काही वर्ष कर्ज फेडण्याच्या चिंतेत जाते .मग मुलांच्या  शिक्षणासाठी व लग्नासाठी बरेच वर्ष जातात .प्रवासात कितीतरी वर्ष जातात. नवर्‍याशी किंवा बायकोशी किंवा सासु सासर्‍याशी जुळवून घेण्यात बरीच वर्ष जातात .
   मग सांगा जन्म व मरण यातील दिवसापैकी किती दिवस तुमच्या हातात उरले आहेत फक्त तुमच्यासाठी .असे दिवस खास काढणे शक्य नाही तेव्हा या सार्‍या दिवसामध्ये स्वतावर कधीतरी प्रेम करा स्वताच्या आवडीचे काही तरी करा .स्वताला कधीतरी चांगले कपडे बुट खाणे पिणे कराथोडा वेळ शांत बसून डोळे मिटा व स्वताकडे बघा.स्वताला आवडेल तेथे फिरायला जा. स्वताच्या आईवडिलांना भेटायला जा त्यांच्याशी गप्पा मारा त्यांच्या सोबत हसाएकत्र जेवण करा त्यांच्या पायांना स्पर्श करा .मित्राबरोबर कधीतरी फेरफटका मारा .पत्नीबरोबर कधीतरी सिनेमा बघा.देवळात जावून देवापुढे भजन मध्ये सहभागी व्हा.किर्तनामध्ये तल्लीन होऊन देवासाठी टाळी वाजा.नाहीतरी म्हणायची वेळ येईल की गेले द्यायचे राहून.समोर गरजवंताचे अश्रू पुसा.यालाच खरे जीवन जगणं म्हणतात.नाहीतर मुलांना सर्वच जन्म देतात वाढवतात व असे करता करता मरून जातात.बघा आवडेल का अस जीवन जगायला?

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...