Skip to main content

मी मुंबईकर

मुंबईकर

पावसाने दिला तडाखा मुंबईला।
संकटाचा सामना  मुंबईकरांनी धीराने केला।।

मराठी गुजराती भैया मुस्लिम झाले होते एकत्।र
धावत होते मदतीला एकसारखे मात्र।।

जात धर्म प्रांत सर्व विसरले।
एक मुंबईकर एवढेच लक्षात ठेवले।।

मंदिर मशिद आश्रम होते सर्वासाठी।
खाणे राहण्याची व्यवस्था करत होते एकमेकांसाठी।।

गरीब श्रीमंत हा भेदच नव्हता ।
माणूसकीचा ठेवा  सर्वांमध्ये होता।।

एका पावसाने मिटवली होती दरी।
एका दिवसासाठी झाली होती एक मुंबईनगरी।।

सलाम करतो पाऊस राजा।
असाच अधीमधी येत जा।।

प्रा. दगा देवरे
रुपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...