Skip to main content

गैरसमज

समज गैरसमज

समज अन् गैरसमज मध्ये
असते मोठी तफावत।
बरेच जण गैरसमज
करून दूरावतात।।

वेळोवेळी करावा दूर
झालेला गैरसमज।
नाहितरी वेगळे रूप
धारण करतो गैरसमज।।

गैरसमज करून घेणे
असते मनाची कमतरता।
विचार करावा भरपूर
मनात ठेवावी शांतता।।

काहीवेळा समज घेते
गैरसमजाची जागा।
पण सत्य असते वेगळे
म्हणून करतात त्रागा।।

समजचे रूपांतर गैरसमजमध्ये
करून घेणारे असतात बरेच जण।
माणसाने वापरावी स्वत:ची बुध्दी
अन् जपावे दुसर्‍याचेही मन।।

गैससमज दुसर्‍याचा काढणे
असते फार अवघड।
स्वत:चेच तुणतुणे वाजवून
करतात स्वत:चेच मन जड।।

गैरसमजामुळे जातात व्यक्ती
कायमच्याच एकमेकांपासून दूर।
येतो मनात कडवटपणा अन्
घुसतो मनात  आरपार।।

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...