Skip to main content

पाणी नसते जेव्हा घरी

पाणी नसते तेव्हा

पाणी नसते जेव्हा घरी
असतात सर्वजण चिंतेत।
काहीच काम सुचत नाही
करतात बाहेर अन आत।।

पाणी नसते जेव्हा घरी
सर्व विषय पडतात बाजूला।
सर्वांच्या मनात एकच प्रश्न
कधी येईल पाणी नळाला।।

पाणी नसते जेव्हा घरी
होते बाहेरच बरीच भटकंती।
इच्छा नसूनही जातात बाहेर जेवायला
अन सर्वजण रेंगाळतात अवतीभवती।।

पाणी नसते जेव्हा घरी
शांतता पडते पटकन बाहेर।
मग हळूच शिरतो राग घरात
जसा दरोडा पाडणारा चोर।।

पाणी नसते जेव्हा घरी
घरात पसरतो दुर्गंध।
मनातही येत नाही कधी
दुसरे विचार विविध।।

पाणी नसते जेव्हा घरी
वाटायला लागते महत्व।
पाणी म्हणजे जीवन
विसरायला होते बाकीचे तत्व।।

पाणी नसते जेव्हा घरी
घरातले लोक दिसतात एकत्र।
एरव्ही बोलायला वेळ नसतो
फिरतात पाण्यासाठी सर्वत्र।।

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...