Skip to main content

अतिरेक

अतिरेक
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकचं असतो .पाऊस जास्त झाला तर तो नकोसा वाटतो.खाणं जास्त झालं तर अजिर्ण होते.घरात कायम आपल्या माणसांबरोबर राहिले कामधंदा न करता तर ते ही कंटाळतात.पैसे जास्त झाले तर विविध कारस्थाने सुचायला लागतात व त्यांचा दुरूपयोग सुरू होतो.प्रेमाचा अतिरेक झाला तर भांडणे सूरू होतात क्षुल्लक कारणांवरून.मैत्रिचा अतिरेक झाला तर अपेक्षा वाढतात व पूर्ण नाही झाल्या तर लोक एकमेकांपासून लांब जातात.म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर ती गोष्ट बिघडते त्यामुळे अतिरेक होत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे.अति तेथे माती म्हणूनच म्हण तयार झाली.अतिरेक विनाशाला कारणीभूत ठरतो म्हणून सावधानता बाळगावी.काही लोक व्यसन करतात पण अतिरेक करतात मग सावरणे कठिण जाते .कोणतीही गोष्ट परिपूर्ण मिळाली मग त्यातले सौदर्य नष्ट होते .म्हणून प्रत्येक गोष्ट करताना अति करू नये .ती गोष्ट नसल्याने हूरहूर वाटली पाहिजे .तिच्याबद्दल कायमआकर्षण वाटले पाहिजे .आपलेपणा वाटला पाहिजे.माणसाला अतिरेक करायला हाव कारणीभूत ठरते.त्याची लालसा कारण बनते व त्यामुळेच तो अतिरेकाचं टोक गाठतो.कुठेतरी स्वताच मर्यादा आखल्या तर मात्र अतिरेक होत नाही.अतिरेक हा पुराच्या पाण्यासारखा असतो म्हणजेच तो आला की सर्व नष्ट करत जातो .जेव्हा कळतं तेव्हा वेळ ही निघून गेलेली असते म्हणून त्याआधीच सावध झालेलं बरे .बघूया जमतं का आपल्याला

प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...