Skip to main content

निर्णय शीघ्रता

निर्णयाची शीघ्रता
जीवनात बर्‍याच वेळेला असे प्रसंग येतात की कसा निर्णय घ्यावा तेच कळत नाही काही निर्णय विचार करून वेळ घेऊन घ्यायचे असतात पण काही निर्णय त्वरीत घ्यावे लागतात थोडा जरी उशीर झाला तरी त्याचे दुरगामी परिणाम भोगावे लागतात  म्हणून क्षणाचाही विलंब न करता असे निर्णय ताबडतोब घ्यावेत उदा.रेल्वेचे आरक्षण केलेले आहे व घरातून तुम्ही असा विचार केला की आपण स्टेशनला दहा मिनिटात पोहचू पण ट्रफिक अशी लागते की रिक्षाने जायला किती  वेळ लागेल हे सांगता येत नाही व चालत गेलात तर तुम्ही दहा मिनिटात पोहचणार अशावेळि रिक्षामध्ये न बसता त्वरीत उतरून स्टेशन पायी पायी गाठावे असा निर्णय न घेतला तर ट्रेन मात्र निघून जाईल व पश्चाताप करायची वेळ येईल तसेच गाडी चालवताना मध्येच जर कुणी आले तर त्यावेळी विचार काही सेकंदात घेऊन लगेच काही सेकंदातच त्याची अंमलबजावणी करायची असते डोळ्याची पापणी हलते त्या आधीच झटपट निर्णय घ्यायचा असतो तरच संकटातून तुमची सुटका होईल नाहीतर फार मोठे संकट कोसळू शकते घरात काही कारणास्तव तंटे होतात त्यावेळी त्वरीत निर्णय घेऊन शांतता कशी निर्माण याचा विचार करावा नाहीतर तेच भांडणे अक्राळविक्राळ रूप धारण करते बोलताना वागताना प्रत्येकाकडून चुका होतात तेव्हा क्षमा त्वरीत मागून समोरच्याला शांत करणे त्यावेळी जरुरी असते व तिच क्षमा मोठ्या भांडणापासून सुटका करते काहीवेळा कुणाचा जीव संकटात असेल तेव्हा त्वरीत निर्णय घेऊन त्याचा जीव वाचवता येईल तेथे विलंब चालणार नाहीमिटींगला जायचे आहे पण काही कारणास्तव लवकर पोहचू शकलो नाही  तर अशावेळी बाकी पर्यायांचा विचार करून लवकर पोहचता येईल का ते पाहावे व हा वाचार काही मिनिटात घ्यायचा असतो काहीवेळा आपल्यावर खोटे आरोप केले जातात तेव्हा हजरजबाबी राहून त्याचवेळी तुमचे मत

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...