Skip to main content

क्रियया तशी प्रतिक्रिया

क्रिया आणि प्रतिक्रिया

क्रिया आणि प्रतिक्रिया सारख्याच असतात परंतु त्यांची दिशा विरोधी असते  जशी आपण क्रिया केली समोरच्या दिशेने तर काही काळाने तीच प्रतिक्रिया म्हणून आपल्याकडे वापस येते  आपण एखाद्याला शिवी दिली तर काही दिवसांनी कुणीतरी तीच शिवी आपल्याला कुणीतरी देणार  .एखाद्याचे आपण वाईट चिंतिले तर तेच विचार परत येऊन आपले  नुकसान करणार म्हणजे आपल्या प्रगतीला व नाशाला आपणच कारणीभुत असतो .आपण कुणाला संकटाच्या वेळी मदत केली तर जेव्हा आपण संकटात असणार तेव्हा कुणीतरी आपल्यासाठी धावून येणार जशी आपण सेवा केली तसा मेवा मिळतो पण हा सायन्सचा नियम लोक विसरले व विचार न करता क्रिया  करतात त्याची प्रतिक्रिया तशीच येईल याचा साधा विचार करत नाही व प्रतिक्रिया आली तर मग दुसर्‍यावर खापर फोडून मोकळे होतात  म्हणून फार सावधपणे शब्द उच्चारले पाहिजेत तसेच कोणतेही कर्म करतांना दहा वेळा विचार केला पाहिजे  बर्‍याच वेळा अनावधानाने कर्म केले जाते तरीही त्याची प्रतिक्रिया येणारच कारण एखादे बी असचं फेकून दिले मातीत तर योग्य वातावरण मिळाले की त्याला अंकूर फुटतोच   त्याचप्रमाणे मुद्दाम किंवा अनावधानाने केलेली प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ठरलेलीच असते म्हणून प्रतिक्रिया कशी येणार याचा आधी विचार करूनच क्रिया केली पाहिजे बर्‍याच गोष्टी आपल्या हातात असतात पण आपण बेसावधपणे वागत असतो व अविचाराने मागचा पुढचा विचार न करता कृती करून मोकळे  होतो व मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपणच असतो आपल्या जीवनाचा शिल्पकार .बघा पटतं का व अनुभव घेऊन बघा व जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
7738601925

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...