Skip to main content

दिवाळी

दिवाळी

गेले दिवाळीचे दिवस आता
उरल्या फक्त आठवणी
एकमेकांकडे कुणी जात नाही
अहंकार भरला आहे मनी

सगळ्यांचे तोंड दाही दिशेला
स्वत:ला समजतात श्रेष्ठ
रागाला केले सगळ्यांनी जवळ
दुसरा दिसायला लागला कनिष्ठ

हसून चर्चा करण्याची मैफिल
आता सगळी संपली
कुणाची तरी लागली दृष्ट
म्हणून नाती वाहून गेली

पैसा आला सगळ्यांच्या जवळ
नाही राहिली कुणाला कुणाची गरज
पण पैसा नसतो सर्वकाही
दुर झाला पाहिजे हा गैरसमज

प्रेमापेक्षा झाली भेटवस्तू
जीवनात अधिक मोलाची
नाही मिळाली मनासारखी
मग वाट लागते नात्याची

मी आणि माझा संसार
हा झाला विचार स्वार्थी
त्यामुळेच होते सारी गडबड
बनून उपयोग नाही परमार्थी

मनाने जातात माणसे लांब
असतो एक शकुनिमामा
भरते कान मंथरा
माणूस बनतो नात्यातून रिकामा

येते दिवाळी जाते दिवाळी
पूर्वीचा आनंद ओसरला
आता  आली  दिवाळी
फक्त उरली म्हणायला

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...