Skip to main content

खोडकर बालक

आत दडलेले   खोडकर बालक

प्रत्येकजण एवढा गंभीर झाला आहे की हसायला जसा विसरूनच गेला चेहरा असा काय गंभीर असतो की सार्‍या जगाचे टेंशन त्याच्य एकट्यावर पडले की काय. काही लोक कधीच हसत नाही मग टेंशन असो की नसो. त्यांचा गंभीर चेहरा बघितल्यावर समोरच्याला टेंशन येते त्यामुळे त्याचाही चेहरा गंभीर होतो . म्हणून साधा प्रश्न असेल तर त्या गंभीर चेहर्‍यामुळे अजून कठिण होतो व एकूणच वातावरण गंभीर होते त्यामुळे मला असे वाटते की प्रत्येकाच्या आत जे बालक दडलेले आहे त्याला कायम जिवंत ठेवले पाहिजे त्यामुळे कठिण प्रश्न सोपे होतात .आपल्या हसण्याने समोरचा टेंशनमध्ये असेल त तो ही रिलॅक्स होतो व टेंशन थोड्या वेळेसाठी विसरतो .त्या गंभीरतेमुळे आपण मनसोक्त खाऊ शकत नाही लोक काय म्हणतील या भीतीने  कृत्रिमपणा आणतो .एखाद्या लग्नात आतील बालक आपल्याला नाचायला सांगते पण आपण तर गंभीर मग कसे नाचायचे .चालतांना गंभीर बोलतांना गंभीर. काम करतांना गंभीर  आपण हसून कुणाचे स्वागत केले किंवा दिसल्यावर smile केले की आपले महत्व कमी होणार की काय असा गैरसमज त्यांच्या मनात असतो.  असे लोक लहान होते का बालकासारखे  कधी असा प्रश्न निर्माण होतो .कधी लहानपणी हसले असतील का? अशा गंभीर माणसापासून लोक लांब राहतात म्हणजे अंतर ठेऊन असतात त्यांच्या गंभीर राहण्याने प्रश्न कठिण होत जातात. पुढे पुढे अशा लोकांच्या तब्बेतीच्या तक्रारी चालू होतात. अनेक मानसिक ताण त्यांच्यावर विराजमान होतात न्यूनगंड अशा लोकांमध्ये निर्माण होतो. वातावरण हलकंफुलकं राहत नाही म्हणून गंभीरता सोडून हसायला पाहिजे मनमोकळेपणाने  .आतील बालक जिवंत झाले पाहिजे मग बघा कसं छान वाटेल.मन कायम आनंदीत असणार व कोणता मानसिक तणाव जाणवणार नाही लोक जवळ येणार .मित्र वाढणार मग जगायला हूरूप येईल घरातील माणसेही आनंदीत होतील व कठिण गोष्ट एकदम सोपी होणार .बघा जमतं का
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...