Skip to main content

जग काय ओसचि पडले

जग काय ओसचि पडले

किती आले अन् किती गेले
गणती नाही कुणी केली
चालूच आहे जगाचे रहाटगाडगे
त्यांच्याविना कुणाचे कामं राहिली

आले ते गेले निघून
राहिल्या काहींच्या आठवणी
उमटवला त्यांनी कार्याचा ठसा
गवसनी घातली त्यांनी गगनी

त्यांच्यामुळेच चाखतो आपण फळं
त्यांच्या कष्टांच्या घामातून आलेली
खर्चि घातले त्यांनी आपले आयुष्य
सुखं सारे त्यांचे वाहून गेली

गायब झाले ते पडद्याआड
कुणालाच कधी न दिसण्यासाठी
अचानक विझला त्यांच्यारूपी दिवा
गेले ते कधीही परत न येण्यासाठी

कुठून आले व कुठे गेले
हे नक्की येत नाही सांगता
जगाचे काही नाही बिघडत
रोजचे व्यवहार चालू आहेत न थांबता

कुणाला नाही कोणती खंत
कारण खंत करून उपयोग नाही
काही केले तरी गेलेले माणसे
परत येऊ मात्र शकत नाही

चालला हा खेळ अनेक युगांपासून
थांबायचं घेत नाही नाव
का खेळला जातो हा खेळ
कुणाला कळायला नाही  वाव

दिवसा मागून दिवस जातात
येतात माणसांमागे माणसे जन्माला
कोण खेळवतो हा नक्की खेळ
त्याची ओळख नाही कुणाला

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...