Skip to main content

अन्नाचा अपमान

अन्नाचा अपमान

ज्याच्यासाठी आपण दिवस रात्र धावतो त्याचाच आपण पदोपदी अपमान करतो जरा इकडे तिकडे बघा लोकं लग्नाच्या पार्टीत हाॅटेलमध्ये ताटात भरभरून वाढून घेतात त्यात थोडे खातात व बाकीचे अन्न टाकून देतात व टाकतांना कोणतीही खंत नसते अन्न टाकतांना सुशिक्षित आणि अशिक्षित सारखेच .एकीकडे लोकांना खायला मिळत नाही व दुसरीकडे अन्न कचर्‍यात फेकून देतात तसेच घरात बर्‍याच लोकांना सवय असते ताटात वाढून घ्यायचे व जेवढे खायचे तेवढे खायचे व बाकीचे टाकून द्यायचे पण जर थोडे थोडे घेतले वआवडले तर ठिक व नाही आवडले तर  जे घेतले ते संपवा व नंतर घेऊ नका आवडले असेल तर अजून घ्या पण तसे न करता एकदम सर्व पदार्थ घ्यायचे जे आवडले ते खायचे व जे नाही आवडले ते टाकून द्यायचे हेअन्न जे टाकतात त्यांची कीव करावीशी वाटते व संतापही येतो काही बहाद्दर बाहेरचे टेंशन घरात काढतात जेवणाचे ताट समोरअसताना जर भाजी नाही आवडली किंवा समोरची व्यक्ती जेवतांना उलटसुलट बोलली तर मग सरळ जेवणाचे ताट फेकून देतात व मी कसं केले याची चवदारपणे चर्चा करतात ज्या अन्नावर आपण जगतो त्याचाच अपमान करतो.एकदा माझा  विद्यार्थी मला भेटायला  आला व त्याला भूकही लागलेली होती मी त्याला जवळच्याच हाॅटेलमध्ये नेले व आम्ही इडली मागवली त्याबरोबर  चटणी पण होती त्याने इडली थोडी चटणी लावून खाल्ली व बाकी  राहिलेली चटणी तशीच पडू दिली शेवटी वेटरने टाकून दिली मी मात्र चटणी   पूर्ण संपवली मला टाकायला नाही आवडतं ज्याच्यासाठी दाहीदिशा फिरतो त्याचाच असा अपमान करू नये अन्नाचा अपमान म्हणजे ज्याने निर्माण केले त्याचाच अपमान ते अन्न शेतकर्‍यापासून तर आपल्या ताटापर्यंत कसा प्रवास करून आले व आपण सरळ टाकून देतो.विचार करा आपल्या अवतीभवती टाकतानाचे चित्र दिसले असेल किंवा आपल्यापैकीच बरेच जण ताटात अन्न टाकून देत असतील  असे टाकल्याने ते अन्न चांगला आशिर्वाद नाही देणार अन्न हे पुर्णब्रम्हा त्या ब्रम्हाचाच आपण अपमान करतो .विचार करा  व अन्नाचा सन्मान करा जेवणाआधीही नमस्कार करा व जेवण झाल्यावरही नमस्कार करा अन्नाला. तेव्हा ते अन्न आनंदी होईल व भरभरून आशिर्वाद देईल व जीवनात कधीच अन्न कमी पडणार नाही
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...