Skip to main content

शेतकरी

शेतकरी

काय केले पाऊसा तू
नाही बरसला चांगला
सारी पिके गेले करपून
शेतकरी झाला पांगळा

होते नव्हते सगळे भांडवल
शेतीत टाकले
आला नाही हातात पैसा
देवा सगळे पिकं वाळून गेले

शेतकरी झाला आता पोरका
नाही त्याला कुणाचा आधार
दुष्काळामुळे घेतली त्याने धास्ती
झाला तो आता निराधार

पोटाची खळगी कशी भरावी
ही  लागली त्याला चिंता
झाला तो कर्जबाजारी
विचारत नाही त्याला कुणी आता

जमिनीवर पडल्या मोठमोठ्या भेगा
त्यातून  दिसते त्याची दैना
कोण होईल त्याचा कैवारी
कसं जगावे रे राणा

तुचं फिरवली आमच्याकडे पाठ
केले हवामानाचे अंदाज खोटे
आम्ही कुणाकडे रे जावे
दमलो मारून खेटे

मुलामुलींचे शिक्षण लग्न
आम्ही कसे करावे
रात्र रात्र येत नाही रे झोप
मग आम्ही फक्त मरून जावे

नको जन्म रे शेतकर्‍यांचा
जीव असतो कायम टांगनीला
कुणालाच आमचं नाही पडलं
जीव येतो आमुचा काकुळतीला

पिण्याच्या पाण्यासाठी लावतो
लांबच लांब आम्ही रांगा
कळले आम्हांला उपयोग नाही
काही करून त्रागा

नको पिझ्झा बर्गर हाॅटेलिंग
काही आम्हांला
दोन वेळची भाकरी
ही हवी आमच्या पोटाला

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...