Skip to main content

गोकूळअष्टमी

गोकुळअष्टमी

बाळ जन्मला माता देवकी पोटी
झाला तो यशोदेचा कृष्ण
केल्या त्याने बाळ लिला
अवघे झाले आनंदी जन

पुतना राक्षसीनीला दाखवले
खरे  आसमान
कंसा सारख्या दृष्टाला
केले भुमिसमान

गवळणी झाल्या होत्या वेड्या
कृष्ण घ्या म्हणत होत्या बाजारी
कृष्ण हेच होते त्यांचे जग
राधा ही झाली होती बावरी

केला दुर्जनांचा त्याने नाश
पाठवले त्यांना यमसदनी
सिध्द केले मीच आहे देव
प्रसिध्द आहे त्यांची वाणी

उचलला  पर्वत द्रोणागिरी
केले लोकांचे रक्षण
हाच आहे खरा देव
म्हणून इंद्र आला शरण

अर्जुनाला सांगितली गीता
ती आजही उपयोगी आहे मानवाला
आहे शब्दांमध्ये तेवढे सामर्थ्य
आकार देते ती जीवनाला

द्रोपदीसाठी धावून आला
राखली त्याने तिची लज्जा
खरा भाऊ शोभला  तो
कृष्ण म्हणताच घेतो मनावर कब्जा

सुदामाच्या मुठभर पोह्यांसाठी
दिली त्याने सोन्याची  नगरी
मित्रप्रेम दिले दाखवून जगाला
मिटवुन टाकली गरीब श्रीमंत दरी

पांडवाचा होता आदर्श कृष्ण
राहिला त्यांच्या कायम पाठीशी
युध्द त्याने जिंकून दिले
सत्याचा विजय हे ठेवले मनाशी

दहीहंडी फोडून दिला
मित्रांना अवघा आनंद
आजही साजरा करतात
त्यामुळे होतो परमानंद

मीराही झाली होती कृष्णमय
दिसत नव्हते त्याच्याशिवाय काय
भजनात व्हायची खूप दंग
प्रकट होण्याशिवाय नव्हता त्याला प्रयाय

कृष्ण कृष्ण म्हणता
लागते ब्रम्हानंद टाळी
व्हावे त्याच्या भजनात तल्लीन
अवघे सुख येईल भाळी

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...