Skip to main content

खटाटोप

खटाटोप

माणूस जन्माला येतो मग काही गरीब घरामध्ये जन्माला येतात की जेथे दोन वेळेचे अन्न नसते राहायला घर नसते अंगावर कपडेही पुरेसे नसतात व काही श्रीमंताघरी जन्माला येतात सगळे सुखं त्यांच्या पायाशी लोळण घेतात पण दोघांनाही मृत्यू ठरलेला असतो मग काहीजण म्हणतात त्याने पूर्वी पुण्य केले असले पाहिजे म्हणून श्रीमंताकडे जन्माला आला व काहींनी पाप केले असणार म्हणून गरीब घरात जन्म घेतला असेलपण मी म्हणतो हा जन्म घेण्याचा मरण्याचा खटाटोप त्या नियतीने कशाला रचला असेल शेवटी सगळ्या गोष्टींचा जर अंत ठरलेला आहे मग हे धावपळीचे जीवन मग कशाला किंवा जीवनाचे प्रयोजनच कशाला .गरीबीतून माणूस शिकतो मोठा होतो पैसे कमवतो व थोडे सुखाचे घास खाऊ लागतो मग क्षुल्लक गोष्ट घडते व त्याचा मृत्यू होतो मग हे जे केले त्याने कष्ट त्याला काहीच अर्थ उरत नाही .जर जे आहे ते संपणारच असेल तर मग कशाला निर्माण केले असेल .निर्माण करायचे व त्याचा अंत करायचा व स्वत: नियती मात्र अमर चिरंजीव निराकार कधीच अंत न होणारी कुणाचाच तिच्यावर दबाव नाही ती स्वत:श्रेष्ठ पण या जगतातील सगळे तिचे बाहूले जशी ती नाचवते तसे आपण नाचतो कधी काय होईल ते नियती शिवाय कुणालाच माहीत नसते . नेतांना मात्र गरीब श्रीमंत तरूण बालक म्हातारा असे काहीच बघत नाही.मग हा खटाटोप मांडला तरी कशाला.काय प्रयोजन असेल. एवढे विश्व निर्माण केले व शेवटी त्याचाच अंत करायचा मग निर्माण तरी कशाला केले .जीवनाच्या चक्रामध्ये कशाला अडकवले .किती पिढ्या गेल्या व किती माणसे गेली याचा हिशोब ठेवणे मुश्किल आहे .हे चक्र का असेल ?जग रहाटी तरी कशाला निर्माण केली .एखादे घर खोटे बांधावे वआईने हाक मारली की लगेच ते मोडून निघून जावे तसेचआहे हे जीवनाचे गणित का बरे असा खेळ मांडला असेल जर संपवायचा असतो हा खेळ मग सुरू तरी कशाला करायला हवा .ह्रा खेळामध्ये सर्व प्राणी झाडे यांना अडकवून गंमत बघायचे काम नियती करत असते व या खेळाला खरं मानून माणूस हा खेळ खेळत असतो व एक दिवशी कळतं की हा खेळ म्हणजे भ्रम आहे व भ्रमाचा भोपळा फुटतो पण वेळ निघून गेलेली असते.  कर्मामध्ये अडकून सर्व लोक सारखी धावपळ करतात पण एक दिवशी हा खेळ किंवा धावपळ थांबते संपते विचार करण्यासारखी गोष्ट आहे व त्याचे उत्तर कुणाकडेही नसणार .प्रश्न सोपा वाटतो पण उत्तर देणे अवघड
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...