Skip to main content

फक्त एकदाच

फक्त एकदाच

माणसाला व्यसन लागते ते एखादे वेळी घेतले तर काय होते असे म्हणण्यामुळेच मग आता हे शेवटचे घेतो याच्यापुढे नाही असे प्रत्येक वेळी म्हणत माणूस ते घेत जातो व घेतल्यानंतर पश्चाताप येतो की का घेतले? पण परत काही दिवस गेल्यावर परत त्याचा त्याच्यावर ताबा नसतो व हे फक्त शेवटचेचं असे म्हणत तो घेतो व असे करता करता किती वर्ष निघून जातात पण ती गोष्ट त्याला कधीच काढून टाकता येत नाही .काही वाईट सवयी ह्या यामुळेच लागतात व अशा चिकटतात की पुन्हा त्या काढुन टाकता येत नाही .काढून टाकण्यासाठी मनाचा निग्रह त्याग हा प्रचंड प्रमाणात लागतो व ह्या ज्या सवयी आहेत त्या जीवनाचे अंतिम सत्य नाही असे जेव्हा मनापासून वाटेल तेव्हा त्या वाईट सवयी काढून टाकणे सोपे जाते .हे फक्त एकदाच घेतो असे जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा तो फसतो व अडकतो त्या सवयींमध्ये व त्या सवयी त्याला गुलाम करतात .हवे तेव्हा त्या त्याला नाचवतात व तो ही नाचतो कारण त्यांच्या तो अधीन झालेला असतो .त्या सवयीमुळे कुणीही कितीही सांगितले तरी त्याला ते खरं वाटत नाही .कुणाचे तो ऐकुनच घेत नाही व त्या सवयी त्याला बरबाद केल्याशिवाय सोडत नाही .चांगल्या सवयीचा माणूस गुलाम झाला तर त्या त्याला प्रगतीपथावर नेतात पण वाईट सयींचा गुलाम त्याला नरकात ढकलतात .तसे पाहिले गेले की चांगल्या व वाईट सवयींचा गुलाम माणसाने होऊच नये .त्या सवयींवर त्याचा हुकूम चालला पाहिजे .हव्या तेव्हा त्याने त्यांना नाचवायला हवे पण ते शक्य होत नाही.बघा पटतं का
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...