Skip to main content

नंदलाल

नंदलाल

कृष्ण कृष्ण म्हणताच
आकर्षित होतो  माणूस
देहभान जातो विसरुन
आहे त्याचे हे गुण खास

देवकीपोटी  जन्म घेऊन
यशोदा घरी वाढला
अनेक दुर्जनांचा वध करून
कंसालाही त्याने संपवला

विश्वरूप दर्शन दाखवून
सिध्द केले मीच आहे देव
ते बघून अर्जून झाला अचंबित
स्तुती करू लागला घेऊन कृष्ण नाव

झाल्या  होत्या गोपीका
त्याच्यामुळे फार वेड्या
दुध दही विकतांना म्हणत होत्या
कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या

राधेवर होते त्याचे विशेष प्रेम
राधाही होती त्याच्यासाठी बावरी
होते तिला सारे माहीत
हाच आहे विश्वाचा मुरारी

कृष्ण कृष्ण म्हणताच
लागते ब्रम्हांनंद टाळी
आहे त्याचे नाम गोड
घ्यावे ते कधीही वेळी अवेळी

म्हणतो तो या मला शरण
वाहीन योगक्षेमं तुमचा
व्हावे आपण निश्चिंत
विश्वास ठेवावा त्याचा

नाही सहन केला त्याने अन्याय
पाठवले शत्रूंना यमसदनी
मीच आहे विश्वाचा राणा
हे दिले त्याने वेळोवेळी पटवूनी

निभावली त्याने मैत्री
सुदामाला देऊनी सुवर्णनगरी
असा होणे नाही पुन्हा मित्र
आहे त्याचा  नंबर सगळ्यांच्या वरी

मिराबाईलाही लागला होता
चांगलाच छंद त्याचा
त्याच्याशिवाय काहीच दिसत नव्हते
लळा लागला होता त्याच्या नामाचा

इंद्राचा गर्व केला त्याने रिकामा
गोवर्धन पर्वंत उचलून
बघून त्याचा पराक्रम
आला होता इंद्र त्याला शरण

बासरीत भरून स्वर
मंजूळ येत होते गाणे
होत्या त्याला गाई आवडत्या
सगळ्यांना वेड लावते होते त्याने

अर्जुनाचा सारथी बनून
केला कौरवांचा पराभव
सांगितली अर्जुनाला गीता
झाला तो विश्वाचा महामानव

गोविंद गोपाळ हरि मुरारी
करु या आज त्याचे भजन
जातील सर्व संकटे दूर
निवारील तो नारायण

असा कृष्ण पुन्हा होणे नाही
ज्याने घेतला होता भारतभूमीत जन्म
करूया त्याची जन्माष्ठी साजरी
सांगू या घे  या मातीत पुन्हा जन्म

प्रा. दगाजी देवरे
7738601925

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...