Skip to main content

दु:ख

दु:खाचे मोजमाप

माणसाच्या आयुष्यांत सुख आणि दु:ख येतच असतात पण जरी दु:ख एक प्रकारचे असले तरी माणसांप्रती ते कमी जास्त वाटते. काहीना ते दु:ख क्षुल्लक वाटते तर काहींना ते मोठे वाटते .शेवटी माणसाच्या दृष्टिकोनावर त्याचे मोजमाप अवलंबून असते काही दु:खातून सहीसलामत बाहेर पडतात पण काही मात्र त्याच दु:खामुळे जीवन संपवतात किंवा नाउमेद होतात .काहीवेळा एखादे मोठे वाटणारे दु:ख छोटे वाटायला लागते कारण त्यापेक्षा मोठे दु:ख आलेले असते .समजा कुणाचा सासरा गेला तर ती सुन खूप रडते व दु:ख  खूप झाले असे वाटल्याने खचून जाते पण काही दिवसांनी पती जातो मग पतीच्या दु:खापुढे ते दु:ख तिला अतिशय कमजोर वाटू लागते व खरे मोठे दु:ख तर हेआहे असे तिला वाटते मग काही दिवसांनी अपघाताने मूलगा जातो मग मुलापुढे पतीचे दु:ख कमी वाटू लागते अशाप्रकारे दु:खाची तिव्रता कधीही फिक्स नसते फक्त आलेल्या दु:खाला कसे सामोरे जातात यातच खरी कसोटी असते काही कसोटी पास होतात तर काही नापास .काही दु:खांना जीवनभर कुरवाळतात तर काही क्षणातच विसरून  पुढचा मार्ग निवडतात व पुढे जातात शेवटी दु:खाची तिव्रता आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते आणि दृष्टिकोन बनलेला असतो आपली संगत घरातील वातावरण तुमचे वाचन फिरणे  तुमचे शिक्षण त्यामुळे विचार तसे बनतात व जसे विचार तशी कृती बाहेर येते.जीवनाचे नेमके सत्य कळले की आलेले कोणते दु:ख व सुख वाटत नाही .माणसाची स्थिती सम होते बघा पटतं का?
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...