Skip to main content

तीन अवस्

तीन अवस्था

सकाळ म्हणजे जणू
एक प्रकारचे असते बालपण
शुद्ध विचार शुद्ध आचार
उत्साही राहते मन

सकाळच्या वेळी मनात येते
चिंतन करावे देवाचे
बालपणीही आवडतात देवाच्या गोष्टी
तेच क्षण असतात संस्कार करण्याचे

दुपार समजावी जणू
तारूण्याचा काळ
मन नसते कधी जागेवर
धावत असते न बघता वेळ

दुपारी अनेक विचार 
घालतात थैमान
तारुण्यातही अनेक विचारांनी
मन होते बेभान

तिसर्‍या प्रहरी लागते
चाहूल म्हातारपणाची
केस पांढरे चेहर्‍यावर सुरकुत्या
चिंता वाढते आरोग्याची

तिसर्‍या प्रहरी कामात येते
थोडीशी शितलता
तसचं होते त्या वयात
शरीरात जाणवते  कमतरता

संध्याकाळ असतो जणू
म्हातारपणाचा काळ
सांगता येत नाही जीवनाचे
कधी काय होईल

संध्याकाळी विचार असतो
दिवसभर काय केल्याचा
म्हातारपणीही असतोच तोच विचार
तरूणपणी काय काम केल्याचा

गाढ झोप ज्याची लागते रात्री
लक्षण आहे दिवसभर चांगले काम केल्याचे
मरणही ज्याला येते शांत
जीवनभर चांगले कर्म ज्याचे

असावा सर्वकाळी उत्साह
सदा आपल्या जवळी
त्याने होतील चांगले कामं
समाजाचे होईल त्यामुळे भले वेळोवेळी

प्रा.दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...