Skip to main content

तीन गोष्

तीन गोष्टी

तीन गोष्टींना असते
जीवनात फार महत्व
आहेत तीनच गुण
तामस रज अन् सत्व

विश्वात महत्व आहे 
फक्त तीनच देवांना
ब्रह्मा विष्णू महेश
असे म्हणतात त्यांना

महत्वाच्या तीनच गोष्टी
असाव्यात माणसाच्या मनी
दया क्षमा शांती असावेत
माणसाच्या सुंदर जीवनी

अनेक झाडांना असतात
विविध प्रकारचे पाने
नाव मात्र घेतले जाते
पळसाला तीनच पाने

स्वर्ग मृत्यू पाताळ
हे ही आहेत फक्त तीनच
त्यांचा सांभाळ करणारे
आहेत देव तीनच

डोकं धड आणि पाय
हे आहेत शरीराचे भाग तीन
ते असावेत धडधाकट
यासाठी प्रसन्न असावे मन

दिवसाचे आहेत भाग तीन
सकाळ दुपार संध्याकाळ
माणूस अडकतो यात
त्यासाठी नाही बघत वेळकाळ

पावसाळा हिवाळा उन्हाळा
ही आहेत तीन मौसम
 देतात जगायला प्रेरणा
 करतात ते आपआपले काम

आई वडिल आणि गुरु
हे तीन आहेत महत्वाचे
त्यांच्या आशिर्वादाने जीवन
होते प्रगतीपथाचे

दत्त दत्त दिगंबरांना
आहेत तीन मुख
त्यांचे दर्शन घेताच
वाटते मनाला खूप सुख

बालपण तारूण्य म्हातारपण
आहेत शरीराच्या तीन अवस्था
प्रत्येकाला जावे लागते यातून
जीवन जगण्याची सुटत नाही आस्था

जीवनात तीन गोष्टीचीच
आहे चर्चा सगळीकडे
तीन तिघाडा काम बिघाडा
असे म्हणतांना का दिसतात चौहीकडे

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...