Skip to main content

विचारांचा जुलाब

विचारांचा जुलाब
जेव्हा आपणनको ते खातो ते शरीरात पचन झाले नाही म्हणजेच शरीराला मानवले नाही तर शरीर ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपले पोट बिघडते त्याला आपण जुलाब म्हणतो तसेच नको ते विचार मनात आलेत व त्यांची गर्दी जेव्हा मनात होते आणि ते विचार मनाच्या विरोधी असतात अशावेळी त्या विचारांना विचारांचा जुलाब झाला असे म्हणू शकतो व हा जुलाब जेव्हा होतो तेव्हा त्याचा परिणाम मनावर होतो .मन सैरभैर होते .कशात लक्ष लागत नाही .कोणतेही काम सहज रितीने होत नाही.माणसाच्या हातून चुका व्हायला सुरवात होते.मन थार्‍यावर नसते .ह्या जुलाबामूळे मानसिक टेंशन होते तसेच रक्तदाबाचा त्रास सुरु होतो व अनेक रोग बाहेर डोकं काढतात असा विचारांचा जुलाब होऊ नये यासाठी सकारात्मक दृष्टिकोण खूप महत्वाचा असतो .भविष्यांची चिंता व भूतकाळातील घटना यांचे चिंतन न करता वर्तमानात जगावे  व आलेल्या समस्येतुन कसा मार्ग काढता येईल याचा विचार करावा तसेच आपल्या हातून कोणत्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी .बोलण्यावर नियंत्रण असावे  मी आहे म्हणून सर्व चालू आहे हा भ्रम काढून टाकावा व मलाच सर्व ज्ञान आहे हा गैरसमज काढून टाकावा दुसर्‍याच्या दृष्टिकोनाचाही विचार करावा त्यामुळे विचारांचा जुलाब आपल्याला थांबवता येईल. जसे शरीराचा जुलाब थांबल्यावर पोटाला कशी छान विश्रांती मिळते तसेच विचारांचा जुलाब थांबल्यावर मनाला शांती मिळते .मनाला शांती मिळाली की शरीर निरोगी बनते  .बघा पटतं का?
दगा देवरे सर
रुपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...