Skip to main content

काळ

काळ 
काळ बसला आहे टपून
संधीची बघतो आहे वाट
संधी येताच मारतो झडप
नाही बघत रात्रं आणि पहाट

नाही बघत बालक आहे की बालिका
बघत नाही तो म्हातारा आहे की तरुण
बघत नाही स्री आहे की पुरूष
असते काळाचे कठोर मात्र मन

सामान्य आहे की असामान्य
याच्याशी त्याला काहीही देणेघेणे नाही
वेळ संपताच एखाद्याची
उचलून नेतो सारे काही

दया याचना चालत नाही काही
ज्याला नेले तो परत येत नाही कधी
थोड्या काळासाठी असते अस्तित्व
माणसाने विचार करावा आधीमधी

सौदर्य कुरुप उंच बुटका
बारीक जाड त्याच्यापुढे असते समान
जैसे कर्म केले तेचि भोगा आले
हा कर्माचा सिद्धांत घ्यावा समजून

मी मी आणि तू तू करण्यात
येते जन्माला आपत्ती
मान सन्मान पैसा संपत्ती पद
क्षणाचै असतात सोबती

लोभामुळे माणूस जातो 
काळाच्या जबड्यात लवकर
स्वार्थी मन माणसाला
सुखापासून ठेवते मात्र दूर

कोणतेही कर्म करतांना
काळाचे नेहमी स्मरण करावे
सतत जागृत राहून माणसाने
सत्याला कधीच न विसरावे

येतो माणूस एकटा जातोही एकटाच
शेवटी असते जीवनाची शून्य बाकी
काहीही घेऊन आलेला नसतो
जातांनाही नसतो नेत काही

दगा देवरे सर

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...