Skip to main content

Posts

Showing posts from October, 2023

मन वढायं वढायं

मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं बहिणाबाईंनी मनाचे वर्णन फार चांगल्या प्रकारे केले आहे.मन माणसावर नेहमी आरुढ होत असते.जसे मन सांगेल त्याप्रमाणे माणूस वागत असतो .मनामागे माणूस फरफटत जातो .जर मनाचे विचार चांगले असतील तर मग चांगला मार्ग सापडतो व माणसाचे कल्याण होते पण जर मनातील विचार चांगले नसतील तर मग मात्र माणसाचे अतोनात नुकसान होते .छोट्या छोट्या गोष्टीवरुन मन माणसाला उकवसते व त्याचे रुपांतर भांडणात होते व अनर्थ घडतो .पाणी जसे नेहमी उताराकडेच धावते तसे मन हे नेहमी वाईट विचार करण्यात मग्न असते .पाण्याला वरच्या बाजूने नेण्यासाठी विशिष्ट मशिनचा उपयोग करुन चढवले जाते त्याचप्रमाणे मनात चांगले विचार हे आपोआप येत नाहीत तर प्रयत्नपूर्वक त्यात आणावे लागतात .त्यासाठी अनेक मार्ग आहेत .मनाची एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे जर काही दिवस एकच गोष्ट नेहमी करत राहिलो तर ती अंगवळणी पडते व मन करायला तयार होते .चांगली गोष्ट असेल तर चांगलेच होते पण वाईट गोष्ट अंगवळणी पडली तर मग मात्र माणसाचे पतन होते.काही दारू, सिगारेट तंबाखू, बिडी, गूटखा खाण्याची सवय लावून घेतात व  ब्लू फिल्म ,वासना चाळवणारे व्हिडिओ ...

समाजातील भयानक चित्र

समाजातील भयानक चित्र आजषौ" तरुण मुलामुलींचे भयानक चित्र समाजात दिसते आहे .तरुण व तरुणींचे शिक्षण पूर्ण झाले पण नोकरी नाही त्यामुळे लग्न नाही .लग्नाचे 25 वय कधीच उलटून गेले .काहींचे तीस पस्तीस ही उलटून गेले पण मुलगी मिळत नाही .जे तरुण नोकरीला आहेत त्यांना स्वत:चे घर आहे का गाडी आहे का जमीन आहे का व पॅकेज भक्कम आहे का असे प्रश्न विचारले जातात .एखादा मुलगा इंजीनिअर असेल किंवा शिक्षक असेल किंवा आणखी कोणत्या खात्यात असेल तर त्याला त्याच्या education सारखी मुलगी पाहिजे असेल तर ती जमीन ,घर ,पॅकेज  चांगले असेल तरच होकार देते म्हणून मुलगा जरी नोकरीला असेल तरी त्याला हवी असलेली त्याच्या खात्यातली मुलगी मिळणे अवघड झाले आहे मग ज्यांना नोकरी नाही त्यांचे तर विचारुच   नका व त्यातून शेतकरी मुलांचा प्रश्न बिकट झाला आहे .पालकांची झोप उडाली आहे 30-35 वर्ष झालीत पण मुलगा व मुलगी बिन लग्नाचे व काही बिन नोकरीचे घरात आहेत .काय करावे काही सुचत नाही 30-35 वर्षात पालकांचा अर्धा संसार झालेला होता पण मुलांची सुरवातच झाली नाही जीवनाला या चिंतेने त्यांना ग्रासलेले आहे यातून मार्ग निघण्याचे मार्ग बंद ...

झोपलेला राक्षस

झोपलेला राक्षस प्रत्येक माणसामध्ये चांगला व वाईट विचार करण्याची क्षमता असते .जसे आपण विचार करणार तसे आपले इंद्रिये प्रभावित होतात व कार्य करायला लागतात .जसे की एखादे भजन आपण ऐकले की आपले मन एकाग्र होऊ लागते .भक्तीभावाने संपूर्ण अंग रोमांचित होते व मन उत्साहाने भरुन जाते पण जर आपल्या मनात एखाद्याबद्दल राग असेल व तो विचार केला तर आतून सुडाची भावना निर्माण होते व तो आत झोपलेला राक्षस त्या आपण केलेल्या विचारांनी जागा होतो व कोणत्या प्रकारे सूड घ्यायचा अशा विचाराने आपण बेचैन होतो तसेच एखाद्याच्या मनात वासना निर्माण झाली तर त्या विचारांनी मन सैरभैर होते मग अत्याचार बलात्कार यासारख्या घटना घडतात .आपण नको ते विचार करुन आत झोपलेल्या राक्षसाला उठवतो व तो जागा झाल्यावर अनेक वाईट कृत्ये घडवून आणतो  व सर्व शांत झाल्यावर तो झोपतो व तोपर्यंत त्याने आपल्याला व  समोरच्याला बरबाद करुन टाकलेले असते त्यामुळे रावण बाहेर नाही आपल्यातच आहे .काहींचा तो कायम जागा असतो तर काहींचा झोपलेला असतो .त्याला जागे होण्यासाठी विचाररुपी खतपाणी आपणच घालत असतो म्हणून मनात वाईट विचार येत असतील तर ते लगेच काढणे सोपे ...