वळण आयुष्याला कधी वळण मिळेल हे कुणालाच येत नाही सांगता काही वळण असते चांगले तर काही वळण बरबाद करते जाता जाता माणूस चालता चालता असतो अनभिज्ञ वळणाची नसते त्याला कल्पना सावध असलेल्या माणसाला भिती नसते वळतांना काळ हा असतो टपलेला झडप घालतो शिकारीवर माणूस असतो त्यावेळी हतबल काहीच उपाय नसतो त्यावर पैसा संपत्ती पद हे ठरते काळापुढे अगदी शून्य माणसाच्या डोक्यातील हवा नियतीपुढे असते नगण्य एका क्षणाला माणूस मारतो भरारी तर दुसर्याच क्षणाला पडतो तो धरतीवर याला काय कारण असावे हे प्रत्येकाचे आहे वेगवेगळे मतेमतांतर काही वळण असते माणसाच्या आयूष्याचा शेवट वळणाआधी माणसाने करावा चांगले काम करण्याचा घाट एका चुकीची शिक्षा कधीतरी चुकवावी लागते कोणत्याही नशेत न राहता जागृतता महत्वाची असते आज आहे ते उद्या असेलच हे सांगता येत नाही देवाचे नामस्मरण करावे त्यामुळे माणूस खचून जात नाही जीवन आहे दोन दिवसाचे याचे स्मरण नेहमी ठेवावे कुणीही आपल्याबरोबर नेहमी असणार ह्या भ्रमापासून दूर राहावे आपण आहोत प्रवासी माहीत नाही कधी संपेल प्रवास प्रवासाचा आनंद घ्यावा मग कुणाचाही असेल सहवास दगा देवरे
सत्य पण असते असत्य आपण जर बघितले तर पृथ्वीचे अस्तित्व विश्वाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे कारण पृथ्वीच्या कैकपटीने मोठे ग्रह विश्वात आहेत .पृथ्वी अवकाशात अधांतरी आहे व ती फिरते आहे .ती अधांतरी आहे व फिरते आहे हे आपल्याला दैनंदिन जीवनात काम करत असतांना दिसत नाही व तसा विचारही मनात येत नाही .अशा अधांतरी पृथ्वीवर अनेक लढाया झाल्या .अनेक महापुरुष जन्माला आलेत .जी पृथ्वी विश्वाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे त्या पृथ्वीवर लोक जमीनीच्या बांधावरुन भांडतांना दिसतात.अशा पृथ्वीवर चार पाच बंगले मोठा अधिकारी म्हणून अहंकार जो घुसतो तो उतरणे शक्य नाही.जो सूर्य दिसतो तो उगतांना व मावळतांना दिसतो पण तसे काही नसते कारण तो स्थिर आहे व हे दिसणे पण आभास आहे सत्य नाही.पुढील बर्याच वर्षाची माणूस चिंता करतो पण पुढील क्षणाला काय होईल हे त्याला माहीत नसते .जेव्हा माणसाला वाटते माझी इनिंग संपली आहे .सर्व मी मिळवले पण पुढचा क्षण असा काही येतो की माणसाला वाटते माझी खरी इनिंग आता सुरु झाली.जे मिळवायचे त्यासाठी नैतिक मार्गाने प्रयत्न करावा व जे मिळाले ते टिकुन रहावे यासाठी देवाकडे प्रार्थना करावी व जे मिळाले त्...