Skip to main content

सत्य पण

सत्य पण असते असत्य

आपण जर बघितले तर पृथ्वीचे अस्तित्व विश्वाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे कारण पृथ्वीच्या कैकपटीने मोठे ग्रह विश्वात आहेत .पृथ्वी अवकाशात अधांतरी आहे व ती फिरते आहे  .ती अधांतरी आहे व फिरते आहे हे आपल्याला दैनंदिन जीवनात काम करत असतांना दिसत नाही व तसा विचारही मनात येत नाही .अशा अधांतरी पृथ्वीवर अनेक लढाया झाल्या  .अनेक महापुरुष जन्माला आलेत .जी पृथ्वी विश्वाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे त्या पृथ्वीवर लोक जमीनीच्या बांधावरुन भांडतांना दिसतात.अशा पृथ्वीवर चार पाच बंगले मोठा अधिकारी म्हणून अहंकार जो घुसतो तो उतरणे शक्य नाही.जो सूर्य दिसतो तो उगतांना व मावळतांना दिसतो पण तसे काही नसते कारण तो स्थिर आहे व हे दिसणे पण आभास आहे सत्य नाही.पुढील बर्‍याच वर्षाची माणूस चिंता करतो पण पुढील क्षणाला काय होईल हे त्याला माहीत नसते .जेव्हा माणसाला वाटते माझी इनिंग संपली आहे .सर्व मी मिळवले पण पुढचा क्षण असा काही येतो की माणसाला वाटते माझी खरी इनिंग आता सुरु झाली.जे मिळवायचे त्यासाठी नैतिक मार्गाने प्रयत्न करावा व जे मिळाले ते टिकुन रहावे यासाठी देवाकडे प्रार्थना करावी व जे मिळाले त्याचा चांगला उपयोग करावा.सत्य असे असते की त्याचा नाश कधीच होत नाही व जगात एकच सत्य आहे ते म्हणजे परमात्मा .माणूस दिसतो ,पैसा दिसतो ,पण तो कायम टिकणारा नाही म्हणजे ते असत्य आहे .जीवनात कोणतीच गोष्ट सत्य नाही कारण प्रत्येकाचा लय हा होणार आहे पण असत्याचा आधार घेऊन सत्य शोधणे हे जरा कठीण आहे पण अशक्य नाही.काही विचार पचायला अवघड असतात .स्वत:च्या स्वार्थासाठी विश्वासघात करणारे माणसे सर्वात अज्ञानी असतात  कारण विश्वासघात करुन जे सुख आहे ते थोड्याच दिवसांसाठी असते पण नंतर मात्र विश्वाघाताचे फळ हे तर मिळणारच असते तेव्हा माणूस कर्म करुन स्वत:लाच दु:खाच्या जाळ्यात अडकवून घेतो .डरकाळी फोडणारे माणसे शेवटी अंथरुणाला खिळणारे बघितले .उंची पोशाख महागड्या गाड्या विमानात फिरणारे माणसे दवाखाण्याच्या बेडवर दवाखाण्याच्या पोशाखात हतबल झालेले दिसतात म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार नसावा .अज्ञान हे दु:खाचे मुळ असते .ज्यादिवशी एखाद्या गोष्टीचे संपूर्ण ज्ञान होते तेव्हा सर्व भ्रम गळून पडतो 
दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...