Skip to main content

नसते घरी तू

नसते जेव्हा घरी तू

नसते जेव्हा घरी तू
घर उठते खायला।
मन होते सैरभैर
शांती नाही वाटतं जीवाला।।

नसते जेव्हा घरी तू
घरंही असतं अबोल।
ते ही बघते वाट तुझी
चार भिंतीत वाटते कोंडलेल।।

नसते जेव्हा घरी तू
होते खाण्याची आबाळ।
भूकेने होतो कोंडमारा
नाही सरत वेळ।।

नसते जेव्हा घरी तू
वाटते सारखे उदास।
जातो सर्व उत्साह
जाता जात नाही दिवस।।

नसते जेव्हा घरी तू
किचन पडते भकास।
काय सांगू तूजला
अंत आता पाहू नकोस।।

नसते जेव्हा घरी तू
मन नाही लागतं कुठे।
सारखे आजारी वाटते मला
तू नसल्याने जाणवतात तोटे।।

नसते जेव्हा घरी तू
किटकांचा असतो वावर।
पुरी झाली ही परिक्षा
नाही मन राहत थार्‍यावर।।

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...