Skip to main content

अनोळखी माणसं

अनोळखी माणसे

रोज दिसतात शहरात
अनोळखी माणसं सारे।            
कधीतरी भेटतो ओळखीचा
वाटते मनाला बरे।।

ट्रेन बसमध्ये गर्दीच गर्दी
नसते जागा पाऊल ठेवायला।
जशा कोंबड्या कोंबलेल्या
शांती नाही लागतं मनाला।।

कुठून येतात  रोज नवे चेहरे
करतात प्रवास एकत्र।
नसते कशाची विचारपूस
राहतात स्व:तात मग्न मात्र।।

जमते कधीतरी कुणाशी मैत्री
अनोळखी जगात वाटतो दिलासा।
मग जमते गप्पांची मैफिल
काही वेळात होतो दिसेनासा।।

लोक सारखे धावत असतात
कारण कुणाला माहीत नसते।
शरीराला झालेली असते सवय
म्हणून स्व:ताला विसरायला होते।।

शहरात विश्वास ठेवणे अवघड
कोण फसविल सांगता येत नाही।
वागावे लागते सावधपणे
शांती फार काळ टिकत नाही।।

पोटापाण्यासाठी लोक येतात शहरात
तेथेच आपले वसवितात घर।
बरेच विसरतात गावाला
कारण पडून गेलेले असते घर।।

शहर हिच झाली आता कर्मभूमी
जे करायचे ते शहरातच करतात।
गावाच्या लोकांना असते आकर्षण
शहरातले लोक सुट्टीत गावाला निघतात।।

प्रा. दगा

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...