वास्तव
बोलायला आहेत बरेच मित्र
पण एखादाच असतो खरा मित्र
असतात बर्याच पदव्या अनेकां जवळ
पण काॅमन सेन्स नसतो मनाजवळ
घर पाहिजे असते भलेमोठे
पण घरात असतात दोन तीन डोके
शोधली माणसांनी औषधे अनेक प्रकारचे
पण बर्याचवेळा रोगावर नियंत्रण नसते कुणाचे
माणसाने ठेवला पाऊल चंद्रावर
पण शेजार्यापासून गेला मात्र दूर
भरपूर असतो पैसा घरात
पण शांती नसते कधी मनात
अनेक बुध्दिमान माणसे असतात
वेळ आली तर स्वत:वरचा ताबा सोडतात
मनगटावर असते भारी किंमतीचे घड्याळ
पण कुणाला भेटण्यासाठी काढत नाही वेळ
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment