शब्द
काही शब्दाने माणसे जोडली जातात।
तर एका शब्दाने माणसे तोडली जातात।।
तलवार पेक्षाही शब्द असतात भयंकर।
दिसत नसूनही असते त्यांना चांगली धार।।
शब्दाने माणसे खळखळून हसतात।
तर काही शब्दाने हमसून रडतात।।
संकटकाळी शब्दानेच येतो धीर।
म्हणून शब्दांनाच म्हणतात वीर।।
शब्दांमुळेच ठरते माणसाची हुशारी।
अन शब्दांमुळेच गाठतो यशाची पायरी।।
शब्दांमुळेच वाढतो मित्रपरिवार।
काही शब्दांमुळेच शत्रूंचा होतो वावर।।
काहीजण शब्दांची बनवतात कटकट।
तर काही प्रेमासाठी बनवतात शब्दांना शाॅटकट।।
शब्द हिच असावी माणसाची खरी संपत्ती।
शब्दांमुळे कधीच येवू नये आपत्ती।।
शब्द हाचि देव शब्द हिच लक्ष्मी।
म्हणून त्याला पुजावा तुम्ही आम्ही।।
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment