जादू
सकाळी उठल्या उठल्या काय खायला पाहिजे याचे चिंतन सुरू व्हायचे मग सकाळी दोन तीन चपाती भाजी बरोबर दुधाचा चहा हे सातच्या आधीच पोटात जायचे मग दहा वाजता नियमित नाष्टा व्हायचा मग स्टेशनवर वडापाव काॅलेजला पोहचल्यावर चहा वडा व्हायचा एक वाजता जेवण मग तीन वाजता परत चहा चार वाजता काहीतरी कॅन्टिनमधून खायचे घरी सहा वाजता आल्यावर परत चहाबरोबर काहीतरी खाणे व्हायचे व रात्री जेवण असा भरगच्च प्रोग्राम होता खाण्याचा .एवढे खाऊनही मनाला शांती नव्हती अवजड डोके व्हायचे शरीराच्या तक्रारी चालू होत्या मग
एक दिवस उजाडला काहीतरी जादू घेऊन श्री जगन्नाथ दिक्षित सरांचा व्हिडिओ बघायला मिळाला व जीवन एकदम बदलून गेले दिनक्रम सुरू झाला सकाळी कोमटपाणी व लिंबू walking सुरू झाले जे खायचे ते फक्त दोन वेळा खायचे. सुरवातीला अवघड गेले पण हळूहळू सवय व्हायला लागली व वजन हळूहळू कमी व्हायला सुरू झाले 25 दिवसात सात किलो वजन कमी झाले इतक्या वर्षी साचलेले वजन कमी झाले एकदम हलकं वाटू लागले शरीरात उत्साह संचारला थकव्याने कायमची रजा घेतली गुडघेदुखी नाहीशी झाली मनशांती मिळू लागली पुर्नजन्म झाला की काय असे वाटू लागले स्वत: हे आपण करू शकू हा प्रयोग असा विश्वास वाटत नव्हता ते शक्य झाले होते खाण्यावरचे मनाचे नियंत्रण आले खाण्यासाठी जे भरकटायचे ते फक्त दोन वेळाच वाट बघते त्यामुळे वाट बघण्यासाठी जी उर्जा खर्च व्हायची ती वाचली व साचलेले वजनाचा बोझा कमी झाला ही जादू मी स्वत: अनुभवतो आहे व इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे .दिक्षित सर जय हो
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment