Skip to main content

लग्नाची बावीस वर्ष

बावीस वर्ष लग्नाची

झाले बावीस वर्ष आमच्या लग्नाला
सारी सुख दु:ख झेलून
आहेत आम्ही आजही बरोबर
आनंदाने पावलो भरून

सुख दु:खात दिली आम्ही
एकमेकांना चांगली साथ
झाल्या असतील काही चूका
नाही केली बंद बात

सगळ्यांच्या सुखासाठी झटलो
केला प्रयत्न दुसर्‍याच्या आनंदासाठी
परतीची कोणतीही अपेक्षा न करता
झटलो मात्र त्यांच्यासाठी

आहेत दोन लाडके
आमच्या संसाराच्या वेलीवर
चमकतात आपल्या क्षेत्रांमध्ये
घेऊन चांगले संस्कार

त्यांना घडवण्यात आई म्हणून
आहे तुझा वाटा मोलाचा
वेळप्रसंगी मनस्ताप सहन करून
केला विचार त्यांच्या भल्याचा

वाटतो मला तुझा अभिमान
नाही केला विचार तु तुझ्या स्वप्नांचा
कायम करत राहिली आमची चिंता
ध्यास घेतला होता तू आमच्या प्रगतीचा

रात्रंदिवस झटली आमच्यासाठी
तुझा विचार बाजूला करून
सतत आम्ही तुझ्या मनात
विचार करून डोळे येतात माझे भरून

झाला असेल मनस्ताप तुला
नाही वागली तू खोटे
सगळ्यांना माफ करत
केले तू मन मात्र मोठे

सगळ्यांना आधार देत
तुला वाटले कधी निराधार
स्वत:च कुढत राहुन
दु:ख दिसू नाही दिले चेहर्‍यावर

घर असो की काॅलेज असो
उमटवला तू आपला ठसा
नातेवाईक व मित्रांसाठीही धावते
नाही टाकला तू तुझा वसा

तू मला हवीस
अनेक जन्मांची सोबती
माफ कर माझ्या चुकांबद्दल
राहावी आपल्यातील कायम दोस्ती

जावो आपले आयुष्य
असंच सुखासमाधानाने
देवाची अशीच कृपा राहो
देवा ठेव आम्हांला आनंदाने

तुझाच दोस्त कवी पती दगा

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...