Skip to main content

तीन गोष्

तीन गोष्टी

तीन गोष्टींना असते
जीवनात फार महत्व
आहेत तीनच गुण
तामस रज अन् सत्व

विश्वात महत्व आहे 
फक्त तीनच देवांना
ब्रह्मा विष्णू महेश
असे म्हणतात त्यांना

महत्वाच्या तीनच गोष्टी
असाव्यात माणसाच्या मनी
दया क्षमा शांती असावेत
माणसाच्या सुंदर जीवनी

अनेक झाडांना असतात
विविध प्रकारचे पाने
नाव मात्र घेतले जाते
पळसाला तीनच पाने

स्वर्ग मृत्यू पाताळ
हे ही आहेत फक्त तीनच
त्यांचा सांभाळ करणारे
आहेत देव तीनच

डोकं धड आणि पाय
हे आहेत शरीराचे भाग तीन
ते असावेत धडधाकट
यासाठी प्रसन्न असावे मन

दिवसाचे आहेत भाग तीन
सकाळ दुपार संध्याकाळ
माणूस अडकतो यात
त्यासाठी नाही बघत वेळकाळ

पावसाळा हिवाळा उन्हाळा
ही आहेत तीन मौसम
 देतात जगायला प्रेरणा
 करतात ते आपआपले काम

आई वडिल आणि गुरु
हे तीन आहेत महत्वाचे
त्यांच्या आशिर्वादाने जीवन
होते प्रगतीपथाचे

दत्त दत्त दिगंबरांना
आहेत तीन मुख
त्यांचे दर्शन घेताच
वाटते मनाला खूप सुख

बालपण तारूण्य म्हातारपण
आहेत शरीराच्या तीन अवस्था
प्रत्येकाला जावे लागते यातून
जीवन जगण्याची सुटत नाही आस्था

जीवनात तीन गोष्टीचीच
आहे चर्चा सगळीकडे
तीन तिघाडा काम बिघाडा
असे म्हणतांना का दिसतात चौहीकडे

प्रा. दगा देवरे

Comments