दोन गडू
जीवनात आपल्याकडे नेहमी दोन गडू असतात त्यापैकी कोणत्या गडूची निवड करायची ते आपल्य हाती आहे .त्या गडूंची संपूर्ण माहीती आपल्याला माहीत झाली की मग प्रश्नच उरत नाही .हे गडू माणसाला फसवतात व माणूस फसतो कारण हे गडू दिसायला आकर्षक असतात पण त्यात बाहेर एक लिहिले असते त्याच्या उलट आतमध्ये असते.एका गडूवर सुख लिहिलेले असते व आत राग, द्वेष, मत्सर फसवेगिरी , शिव्यागाळ, मारामारी , व्यसने ,गुंडगिरी,वासना अशा वाईट गोष्टींचा खजिना भरलेला असतो व अशा गोष्टी केल्याने काहींना असूरी आनंद मिळतो व तेच सुख आहे असे त्यांना वाटते म्हणून परत परत लोक त्याच गोष्टी करत असतात व त्यातून सुख प्रारंभीला त्यांना जाणवते पण सुखाचा तो आभास असतो व अंतिम, माणसाच्या पदरी दु:ख मिळते व हे सुख नसून दू:ख आहे व हा गडू सुखाचा नसून दु:खाचा आहे याची जाणीव होते पण हे समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.दुसरा गडू असतो त्यावर दु:ख लिहिलेले असते व आत त्याग प्रेम करुणा शांती दया परोपकार पुण्य दान सेवा हे सर्व आत भरलेले असते पण माणूस सहसा या गडूकडे बघत नाही .वास्तविक जरी या गडूवर दु:ख लिहिलेले असले तरी आत भरलेला खजिना ज्याला सापडला व त्याचा जीवनात उपयोग केला तर सुखाच्या राशी हजर होतात .ते सुख घेण्यासाठी त्याची ओंजळ अपूर्ण पडते .माणसाने ठरवायचे कोणता गडू घ्यायचा .पहिला गडू घेतला की सुरवातीला सुख वाटते पण अंतिम दु:ख येते व दुसरा गडू घेतला तर सुरवातीला दु:ख वाटते पण नंतर सुखच सुख असते .ज्याने हे अनुभवले तो आपल्याला हवा असणाराच गडू निवडणार .बघा पटतं का?
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment