Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

सुख

सुख  प्रत्येक माणूस सुखासाठी झटत असतो पण सुख म्हणजे नेमके काय हेच माहीत नसते .बर्‍याच जणांना वाटते हाती भरपूर पैसा बंगला गाड्या नोकर चाकर म्हणजे सुख व ते मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात .काहींना वाटते हाती मोठे पद म्हणजेच सुख . काहींना वाटते आपली मुलेबाळे व्यवस्थित मार्गाला लागले म्हणजे सुख.म्हणजे मोठमोठ्या गोष्टीत सुख पाहिले जाते पण जेव्हा स्वत:च्या शरीराला हानी पोहचते की जी जीवावर बेतणारी असते .अतोनात यातना होतात की ज्या सहन करण्या पलिकडच्या असतात तेव्हा माणूस आपल्या जवळ असलेले किंवा मिळवलेले घर बंगला गाडी नोकर चाकर पती पत्नी मुले बाळे पद हे सर्व विसरतो व ज्या यातना होता आहेत त्या कशा बर्‍या होतील व त्या बर्‍या व्हाव्यात व त्या यातनांतून सुटका व्हावी अशी अपेक्षा असते व त्या यातनातून सुटका झाली की सुख अशी भावना तयार होते पण जेव्हा यातना नव्हत्या तेव्हा मात्र इतर गोष्टींमध्ये सुख शोधत असतो पण यातना सुरु झाल्या की मृगजळाप्रमाणे बाकी गोष्टी विसरतो व आपल्याला बरे वाटेल यातनांतून ते खरे सुख असे वाटायला लागते म्हणून सुख म्हणजे नेमके काय हे माणसाला समजले की मग बरेच प्रश्न आपोआप सुटतात ...

आज me bhrama pahile

आज मी ब्रम्हं पाहिले हिरवा रंग निसर्गात  पुरेपुर देवाने भरला पाहून मी थक्क झालो त्याच्यात मी ब्रम्हं पाहिला सागरात खेळते पाणी लाटांरूपी शालू नेसला सागरात मस्त डोलतांना मी ब्रम्हं तो पाहिला आकाश पसरले दुरवर निळा रंग हा त्याने भरला ढगांचे विविध रूपात मी ब्रम्हं तो पाहिला पावसाच्या सरीवर सरीबरोबर ढगांचा गडगडाट ऐकला वीजांच्या त्या लखलखाटात मी ब्रम्ह तो पाहिला पक्षांचा मधूर मधूर आवाज पहाटेच्या प्रहरी आला कोकीळच्या गोड गाण्यात मी ब्रम्हं तो पाहिला लहान लहान बालके घालतो तो जन्माला त्यांच्या निरागस हसण्यात मी ब्रम्हं तो पाहिला आकाशात  ग्रह तार्‍यांचा सडा हा पडला शीतल चांदण्या रात्री मी ब्रम्हं तो पाहिला गाय वासरात प्रेम बघून मायेचा ओलावा आठवला गायीच्या त्या डोळ्यात मी ब्रम्हं तो पाहिला गोरगरीबांची सेवा करण्यात कुणीतरी त्यात रमला त्या व्यक्तीच्या रूपात मी ब्रम्हं तो पाहिला आईवडिलांच्या पुण्यांईने आजपर्यंत मी वाढला त्यांच्या निस्वार्थ ममतेत मी ब्रम्हं तो पाहिला गुरूजनांच्या ज्ञानाने प्रगतीचा शिखर गाठला त्यांच्या त्या व्यक्तीमत्वात  मी ब्रम्ह तो पाहिला मित्रमंडळीने माझ्या जीवनी आनंद...

जसे पेराल तसे उगवेल

जसे पेराल तसे उगवेल जसे जमीनीत आपण बी टाकतो व त्याला वातावरण योग्य लाभले की त्याला अंकुर फुटण्यास सुरवात होते व ते वाढायला लागते .जे बी टाकणार तोच वृक्ष तयार होणार व तशीच फळं हे लागणार त्याचप्रमाणे आपण जाणते अजाणते कर्म करत असतो व प्रत्येक कर्माचे फळ हे ठरलेले असते म्हणजे आपणच आपल्या जीवनाची दिशा निश्चित करत असतो .आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो  .जे कर्म केले तेच काही दिवसांनी काही महिन्यांनी काही वर्षानी काही जन्मांनी आपल्याकडे परत येते .माणूस कर्म करतांना विचार करत नाही पण जेव्हा ते परत येते तेव्हा मग गडबडून जातो व आपल्या नशिबाला दोष देतो पण आपणच केलेले कर्म आपल्याकडे परत येत असते .बर्‍याच वेळेला आपल्याला माहीतही नसते की आपण ते कर्म केलेले होते .म्हणून कर्म करतांना फार विचारपुर्वक केले पाहिजे.आपण जसे दुसर्‍याशी वागतो तसेच कुणीतरी आपल्याशी तसेच वागणार त्यामुळे  दुसर्‍याशी बोलतांना वागताना प्रेमपूर्वक भाषा वापरली पाहिजे .ज्यांना ह्या गोष्टीवर विश्वास असतो ते कधीही घमेंडीने बोलत नाही किंवा तुसडेपणाने बोलत नाही .मोठे लोक जे असतात ते नम्र असतात की ज्यांना हा नियम कर्माचा माहीत...

जीवन हे स्

जीवन हे माणसाला पडलेले स्वप्नच ज्यावेळी माणसाला स्वप्न पडते त्यावेळी स्वप्नात त्याला कळत नाही की हे स्वप्न आहे .खरं मानूनच स्वप्नात तो व्यवहार करतो .काही वेळातच परदेशी सुद्धा फिरून येतो .सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा त्याला कळतं की स्वप्न होते ते .जोपर्यंत स्वप्न होते तोपर्यंत स्वप्नातच जगत होता पण जागृत अवस्थेमुळे ते स्वप्न नाहीसे होते व जे स्वप्नात पाहिले ते खरे नव्हते असे त्याला जागे झाल्यावर कळते पण स्वप्नात तो रडतो कधी आनंदी होतो कधी कधी सगळीकडे फिरून येतो पण स्वप्न पाहणार्‍यापेक्षा तो मात्र वेगळा आहे झोपलेला आहे हे त्याला स्वप्न असेपर्यंत कळतच नाही .जेव्हा त्याला जाग येते तेव्हा त्याला वाटू लागते की मी वेगळा आहे व जे पाहिले तो भास  होता त्याचप्रमाणे माणूस जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत  हे जे चालले आहे ते स्वप्नच की .ह्या स्वप्नात आपण आनंदी होतो दु:खी होतो व आपण खरे कोण हे मात्र विसरुन जातो कारण आपल्याला अजून जागच आलेली नाही त्यामुळे हे सर्व खरं मानून चालतो आहे .संताना जागृत अवस्था प्राप्त झालेली असते . स्वप्नाच्या अवस्थेतून जेव्हा जागृत अवस्था प्राप्त होते तेव्हा त्यांना हे...

कांदा

कांदा एकवेळ आली होती अशी कांद्याला देत नव्हते कुणी किंमत शेतकरी फेकत होते रस्त्यावर बिचारा पडून राहायचा निपचित कुणी त्याचे खत करायचे तर कुणी जनावरांना द्यायचे खायाला फुकट घेत नव्हते  कुणी कांदा शेतकर्‍यांना वाटायचे उगीच तो पिकवला कांदा गेला देवाच्या पायी केली विनवणी त्याने देवापाशी माझे महत्व वाढू दे नारळ फोडीन तुझ्या पायाशी ऐकले देवाने कांद्याचे गार्‍हाणे येईल तुला खूप महत्व लोकं तुला प्रेमाने कुरवाळतील वाटेल तुझ्याप्रती त्यांना ममत्व कांद्याचे महत्व वाढले तो जाऊन बसला सफरचंदाजवळ सगळ्यापाशी एकच चर्चा असावा फक्त कांदा जवळ एक किलो कांद्याने डाॅलरलाही मागे टाकले हाॅटेलातून गायब झाला कांदा सोन्यासारखे भाव त्याचे झाले कांदा आहे ज्याच्याजवळ त्याला समजतात श्रीमंत आणले मिरवून कांद्याला मोजून चांगली किंमत रस्त्यावरचा कांदा गेला उंचच उंच गगनावरी काहींना दिसत नाही तो त्यांच्यापासून आहे तो दूरवरी कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू गोरगरिबांच्या डोळ्यांत मात्र आणलेत त्याने दु:खाश्रू कांद्याचे शेतकरी बर्‍याच वर्षानी चांगलेच सुखावले कर्ज बर्‍याच जणांचे फेडून दोन पैसे गाठीशी राहि...