Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

आत्मविश्वास

आत्मविश्वास बडी चीज होती है बाबू माणसाला कोणतेही काम यशस्वीपणे करण्यासाठी आत्मविश्वास असावा लागतो .हा आत्मविश्वास का डळमळतो त्याचे प्रथम कारण म्हणजे शरीर.जोपर्यंत शरीर तंदूरुस्त आहे तोपर्यंत लाथ मारील तेथे पाणी काढील असा आत्मविश्वास असतो पण जेव्हा शरीराच्या तक्रारी चालू होतात उदा. एखाद्याला कॅन्सर झाला ,अपघाताने शरीराचे अवयव निकामी झालेत पॅरालेसीस झाला, हार्टअॅटेक येऊन गेला  डोळ्यांचे आजार किडनीचे आजार मेंदूचे आजार असे लवकर बरे न होणारे आजार जेव्हा जडतात तेव्हा भरपूर आत्मविश्वास असणार्‍या माणसांचा आत्मविश्वास संपतो .लाथ मारील पाणी काढणार म्हणणारे लोक दैनंदिन स्वत:चे कामही करु शकत नाही .पूर्ण आत्मविश्वास गमावून बसतात .त्यातच काही मार्ग काढतात व पुन्हा उभे राहतात पण ते प्रमाण क्वचितच दिसते.दुसरे कारण म्हणजे ज्या माणसांवर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच माणसांनी धोका दिला तर माणूस आत्मविश्वास गमावून बसतो त्याचप्रमाणे ज्या माणसांवर आपण प्रेम करतो ,ती व्यक्ती म्हणजे आपले जीवन ,जे जगतो त्या व्यक्तीसाठी व अशी व्यक्ती जेव्हा जग सोडून जाते तेव्हा कुणासाठी जगावे,कुणाकडे पाहून जगावे या विचारांमु...

भेट

भेट आपल्या प्रिय माणसांची भेट घ्यायला नेहमीच आवडते आपल्याला  नवीन उर्जा मिळते भेटीतून उत्साह वाटतो जगायला निस्वार्थ भेटीने माणूस नाचतो आनंदाने तो स्वत:ला विसरतो आपल्या माणसाच्या प्रेमाने काही वेळा होते जीवनात अनपेक्षित असलेली भेट राहते नेहमी लक्षात कोणतेही नसलेली अट बर्‍याच भेटी होतात काहीतरी ठेऊन अपेक्षा टेंशन येते माणसाला अशी भेट होऊ नये ही इच्छा काहींची भेट असते कधीच न विसरणारी ती  भेट  असते नेहमी आनंद देणारी   काहीं जणांची भेट  ठरते कामाच्या धावपळीची कल्पना केलेली नसते  ही भेट असेल शेवटची स्बत:चीच स्वत:शी भेट होणे हे असते दुर्लभ ते जमते साधूसंतांना म्हणून होत नाही त्यांना कोणता लोभ काहींची भेट न होणे हे असते चांगले उगीचच होतो डोक्याला ताप बरे असते ते न दिसलेले प्रा. दगा देवरे

वाट पाहणे

वाट पाहणे जीवनात वाट बघितल्याशिवाय काहीही मिळत नाही .जन्माला येण्यासाठी नऊ महिने वाट बघावी लागते .मग बाळाला बसण्यासाठी उभे राहण्यासाठी रांगण्यासाठी धावण्यासाठीवाट बघावी लागते शाळेत जाण्यासाठी वाट पहावी लागते  .परिक्षा येण्यासाठी वाट पहावी लागते .निकालासाठी वाट पाहावी लागते .नोकरीसाठी ,लग्नासाठी वाट पहावी लागते . वाट जर नाही बघितली तर प्रचंड नुकसान ठरलेले असते .काहीवेळा वाट पाहूनही पदरी काहीच पडत  नाही. काहीजण संपूर्ण जीवन वाट पाहण्यातच घालवतात. वाट पाहण्यालाही एक limit असते वकुणाची किती वेळ वाट पहावीहे समजले पाहिजे नाहीतर जीवन वाट पाहण्यातच जाईल .काही गोष्टींची वाट पाहण्याची गरज नसते तसेच काही गोष्टी वाट न बघता लगेच कराव्यात म्हणजे काही गोष्टींची वाट पाहिली तर आपली वाट लागलीच समजा.वाट पाहतांना त्यातून काहीतरी निष्कर्ष निघेल त्याच गोष्टीची वाट पाहावी.काहीजण वर्षानुवर्ष अंथरुणाला खिळलेले असतात व ते जाण्याची काही वाट बघतात.कुणाच्या जाण्याची जे वाट बघतात ते अत्यंत वाईट असते.आपला जवळ जवळ 25%जीवनाचा वेळ वाट पाहण्यातच जातो .50% वेळ झोपण्यात जातो.25%वेळ टाइमपास करण्यात जातो व जे साधाय...

पैसा

पैसा पैसा हा देव  नाही देवाहून त्याचे महत्व कमी नाही ज्याच्याजवळ तो कमी त्याला जगात किंमत नाही पैशासाठी लोक बोलतात खूप खूप गोड एकदा दुसर्‍याकडून मिळाला  मग दाखवत नाही कधी तोंड बरेच नाते पैशांमुळे बिघडून कायमचे तुटून जातात पैसा ठरतो नात्यापेक्षा श्रेष्ठ करतो तो नात्यावरच आघात नात्याची किंमत करतात लोक फक्त पैशाने पैसाच ठरवत असतो किती संबंध आहेत प्रेमाने काही कमवतात खूप पैसा खर्च करण्याची नसते इच्छा अजून तो कसा जमा होईल याची ठेवतात अपेक्षा पै पै जमा करून योग्य वेळी खर्चावा ज्याला अडचणीला दिला त्याने वेळेत परत करावा पैशाने तोडले कायमचेच रक्त नात्यातले संबंध पैसा हा नातेही जोडतो घट्ट करतो भावनिक बंध पैशाने येऊ नये  माणसात कधी गर्व वेळ कधी कशी येईल तेव्हा गमावून बसणार सर्व पैसा आहे लक्ष्मी योग्य मार्गाने तो कमवावा त्याचा करावा मानसन्मान योग्य ठिकाणी जपून वापरावा पैसा नसला तरी कर्तृत्वाने झाले काही थोर पैशांमुळे जाऊ नये आपली माणसे दूर गोड गोड बोलणारे माणसे दुसर्‍यांना नेहमी फसवतात त्यांचा असतो हाच विचार समोरच्याचा पैसा कसा येईल आपल्या खिशात भ्रष्टाचाराच्या पैशापेक्षा घामाचा पैसा...

धनतेरस

धनाची पूजा धनतेरच्या दिवशी धनाची पूजा करतात पण जे धन दुसर्‍याला फसवून कमविले असेल तर ती पूजा व्यर्थ ठरते .जे धन अनितीने कमविले असेल तर त्या पूजेला अर्थ नसतो .घामाच्या पैशाने कमविलेले धन ,नितीमत्ताने मिळविलेले धन येथे अपेक्षित असते.खरे धन तर विचाररुपी धन असते .ज्या माणसाजवळ चांगल्या विचारांचे धन असते तसेच सकारात्मक विचाररुपी धन असते ,ज्या विचारांमुळे दुसर्‍याला जगण्याला योग्य दिशा मिळेल असे विचाररुपी धन ज्याच्याजवळ असते त्या धनाची पूजा केली पाहिजे व त्या धनाची कुणीच चोरी करु शकत नाही तसेच धनासारखे अमूल्य माणसे जेव्हा आपल्या विचारांमुळे जवळ येतात अशी माणसे जपणे म्हणजेच खर्‍या धनाची पूजा करणे होय .ज्यादिवशी धनासारखे माणसे आपल्यामुळे दूर गेलेत तर पूजा विस्कटित झाली असे समजा म्हणून आपल्या जीवनात नेमके धन कोणते याचा विचार करुन त्याची काळजी घेणे त्याला योग्य सन्मान देणे हे एकाच दिवशी नाही तर नेहमी जमले पाहिजे.धन नितीने कमविणे व त्याचा योग्प वापर करणे  हे धनाचा सन्मान व त्याची पूजा करणे होय .काही माणसे धन कमवितात ते बॅकेत ठेवण्यासाठी तसेच चांगले विचार दुसर्‍याला न देता फक्त स्वत:साठी वापर ...