Skip to main content

Posts

सत्य पण

सत्य पण असते असत्य आपण जर बघितले तर पृथ्वीचे अस्तित्व विश्वाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे कारण पृथ्वीच्या कैकपटीने मोठे ग्रह विश्वात आहेत .पृथ्वी अवकाशात अधांतरी आहे व ती फिरते आहे  .ती अधांतरी आहे व फिरते आहे हे आपल्याला दैनंदिन जीवनात काम करत असतांना दिसत नाही व तसा विचारही मनात येत नाही .अशा अधांतरी पृथ्वीवर अनेक लढाया झाल्या  .अनेक महापुरुष जन्माला आलेत .जी पृथ्वी विश्वाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे त्या पृथ्वीवर लोक जमीनीच्या बांधावरुन भांडतांना दिसतात.अशा पृथ्वीवर चार पाच बंगले मोठा अधिकारी म्हणून अहंकार जो घुसतो तो उतरणे शक्य नाही.जो सूर्य दिसतो तो उगतांना व मावळतांना दिसतो पण तसे काही नसते कारण तो स्थिर आहे व हे दिसणे पण आभास आहे सत्य नाही.पुढील बर्‍याच वर्षाची माणूस चिंता करतो पण पुढील क्षणाला काय होईल हे त्याला माहीत नसते .जेव्हा माणसाला वाटते माझी इनिंग संपली आहे .सर्व मी मिळवले पण पुढचा क्षण असा काही येतो की माणसाला वाटते माझी खरी इनिंग आता सुरु झाली.जे मिळवायचे त्यासाठी नैतिक मार्गाने प्रयत्न करावा व जे मिळाले ते टिकुन रहावे यासाठी देवाकडे प्रार्थना करावी व जे मिळाले त्...
Recent posts

राग मारी वाघ मारी

राग मारी वाघ मारी राग असतो गड्या जीवनात फार घातक मनाच्या कोपर्‍यात असतो दडून बाहेर पडताच असतो मारक रागाने लावली भल्याभल्यांची वाट केली आयुष्यांची राखरांगोळी स्वप्नांचा करतो क्षणार्धात चुराडा वाट बघतो बाहेर येण्याची प्रत्येकवेळी बदला घेण्याच्या मुळाशी असतो राग माणूस विसरतो तेव्हा सारासार त्या एकाच क्षणासाठी मन बनते माणसाचै सैरभैर तुरुंगात खितपत पडलेत गुन्हेगार ऐन आयुष्यांच्या तरुणपणी माणसाचा जन्म गेला त्यांचा वाया ह्या सुंदर आयुष्यांच्या जीवनी सारे जग आहे माणसाला जीवनात आनंद घेण्यासाठी रागाने कोंडले जेलच्या चार भिंतीत केलेल्या कृत्याचा पश्चाताप करण्यासाठी राग दिसत नाही माणसाला क्षुल्लक कारणांनी करतो माणसावर मात प्रत्येकक्षणी माणसाने सावध राहून त्याच्याशी करावी शांत मनाने बात सुंदर चालले असते आयुष्य रागाने होते क्षणार्धात उध्वस्त कुणीतरी जवळचा असावा मित्र ज्याच्याजवळ व्हावे माणसाने व्यक्त राग जेव्हा येतो माणसाला प्रिय व्यक्तीच्या जीवावर माणूस उठतो ज्यांचे असतात अनंत उपकार त्यांनाच माणूस संपवतो रागाने जातो माणूस आपल्याच माणसांपासून लांब सर्व नाते तोडून म्हणतो माझीच खरी बाब अन्यायाबद्दल या...

घटकाभर विश्रांती

घटकाभर विश्रांती सकाळ पासून रात्रीपर्यंत सारखा असतो तू धावत का व कशासाठी करतो मी असा प्रश्न शिरत नाही मनात काही जण नाष्टापाणी न करता निघतात आपल्या कामाला एकच मनात असतो विचार उशिर होऊ नये जायला वेळेवर नसते खाणेपिणे मन नसते जागेवर सारखी चिंता असते सतावत माणूस नसतो भानावर पैसा पैसा करत करत संपत्ती घ्यायचा असतो ध्यास स्वत:च्या शरीराचा विचार न करता मनात भरलेला असतो हव्यास कुठे तरी आता थांबले पाहिजे हा विचार करायला नाही वेळ स्वत:कडे दुर्लक्ष करुन नाही अंगात राहिले बळ कुणाशी बोलायला नाही वेळ नाही वेळ कुणाची मदत करायला सततच्या कामाच्या धावपळीत विश्रांती नाही जीवाला दुसर्‍याची निंदा करण्यात खर्ची करतो आपले जीवन दुसर्‍याला धडा शिकविण्यात गुंतले असते सतत मन काळ जवळ येऊन ठेपला तरी हव्यास नाही संपला एका छातीतल्या कळने त्याचा जीव मात्र घेतला शरीर सर्व बाजूंनी सुटले याचे नाही राहिले भान संपतीच्या हव्यासापायी धावत असते तनमन पद व प्रतिष्ठा यासाठी जातो तू कोणत्याही थराला ते सारे असते क्षणिक हे मात्र तू विसरला आपण आहोत पाहूणे पृथ्वीवर थोड्या दिवसांसाठी काही वेळ माणसाने काढावा दुसर्‍याला मदतीचा हात देण्या...

लगाम

लगाम माणसाला हवा लगाम कोणतेही काम करतांना सुरक्षित होते त्याचे काम कोणतीही अडचण येत नसतांना बोलतांना हवा लगाम दिसतो अनर्थ टळतांना लगामाने येते वागतांना तारतम्य सामर्थ्य येते अडचणींचा सामना करतांना संस्काराने येतो लगाम कोणाचेही दडपण नसतांना लगाम ठरवतो माणसाला कुठे व कधी थांबतांना साम दंडाने घालता येतो लगाम माणसाला अनर्थ टाळण्यासाठी त्यावेळी येतो त्याला राग पण लगाम असतो त्याच्या भल्यासाठी कोणतीही गोष्ट अती ही वाईटच त्यासाठी हवा मात्र लगाम माणसाचे जीवन होते सुखकर मार्गी लागते त्याचे काम लगाम नसलेला माणूस जातो आहारी स्वत:चे नुकसान करण्यासाठी जेलमध्ये आहेत गुन्हेगार लगाम नसल्याने आहेत त्यासाठी जबरदस्तीने लगाम नसतो उपयोगाचा हवा स्वत:चा निश्चय परिणामांचा विचार करुनच पाऊले टाकावी जीवनात योग्य अत्याचार बलात्कार खून होतात माणसाला लगाम नसल्याने माणूस तारतत्म हरवतो लगाम योग्यवेळी न घालण्याने माणसाचे जीवन आहे क्षणभंगूर हा विचारच आहे त्याचा लगाम क्षणिक सुखासाठी माणूस होतो सैरभैर दु:ख पदरात पाडण्यासाठी संत महापुरुषांचे विचारच घालतात माणसाला जीवनात लगाम त्यांच्या आचार विचारांचे अनुकरणाने सहीसलामत होते...

फोटो

फोटो वाॅटसअपमध्ये फोटो बघतास उडते मनाची धांदळ काय असेल मेसेज खाली यासाठी मनाची होते तळमळ फोटोखाली शुभेच्छा दिसल्यावर मन होतेआनंदी मग बराचवेळा वाॅटसअप बघण्यात मनावर घालता येत नाही बंदी फोटोखाली श्रद्धांजली बघितल्यावर मनाची होते घालमेळ काय झाले असेल असा विचार करत मन विसरते काळवेळ जवळची व्यक्ती गेली कळल्यावर मन होते बैचैन दिवसभर त्याच्याच विचाराने मन होते उदासिन वाॅटसअपवर कुणाचे कौतूक वाचून शुभेच्छा अभिनंदन सहजच करतो त्याच्या परिश्रमाला आपण सलाम करुन जातो काहींचे जाणे वाचल्यावर अश्रूंचे पाट वाहतात त्यांचा चेहरा नेहमी डोळ्यांसमोर येऊन मनात आठवणी दाटतात वाॅटसअप उघडल्यावर काय असेल बातमी  हे कुणाला नाही येणार सांगता ती बातमी बघूनच  मनाची कळणार अवस्था दगा देवरे सर

जीवन एक कथा

जीवन एक कथा खरे पाहिले तर जीवन असते एक कथा.कितीही माणूस मोठा झाला तरी एक दिवस त्याची कथा बनते व ती कथा ऐकायला मिळते .काहींची कथा पराक्रमाची त्यागाची शौर्याची असते तर काहींची कथा दुष्टचक्रांची असते त्याच्या कुकर्माची असते .माणूस एवढा गुंतून जातो की त्याला विसर पडतो की आपली एक दिवशी कथा हो,  ळीनननलतशॅङङ  आहे.काहीजण दुसर्‍याशी एवढे वाईट वागतात की सांगायला नको त्याचे कारण म्हणजे ते विसरतात की आपली कथा होणार आहे .त्याला वाटते की आपण कायमस्वरुपी असणार आहोत   त्यामुळे त्याला लोभ होतो व त्या लोभामुळे जास्तीत जास्त संपत्ती कोणत्याही मार्गाने कशी वाढेल याचा विचार करतो व त्यावेळी आपल्या अवतीभवती असलेल्यांना तो तुच्छ मानतो.काहीजण व्यसनांच्या आहारी जाऊन स्वत:चा नायनाट करुन घेतात व कथा लवकर बनून जातात .काहीजण संपत्तीवरुन  स्वत:च्याच लोकांशी अबोला धरतात व एक दिवशी अबोला धरणारे व त्यांना अबोला धरायला लावणारे कथा बनून जातात व संपत्ती जागेच्या जागी राहते .ज्यावेळी माणसाला कळेल की आपण जे ही करतो आहोत ती एक दिवशी कथा होणार आहे त्यावेळी माणूस सतत जागृत राहील व आपल्याकडून कोणतेही वाई...

काळ

काळ  काळ बसला आहे टपून संधीची बघतो आहे वाट संधी येताच मारतो झडप नाही बघत रात्रं आणि पहाट नाही बघत बालक आहे की बालिका बघत नाही तो म्हातारा आहे की तरुण बघत नाही स्री आहे की पुरूष असते काळाचे कठोर मात्र मन सामान्य आहे की असामान्य याच्याशी त्याला काहीही देणेघेणे नाही वेळ संपताच एखाद्याची उचलून नेतो सारे काही दया याचना चालत नाही काही ज्याला नेले तो परत येत नाही कधी थोड्या काळासाठी असते अस्तित्व माणसाने विचार करावा आधीमधी सौदर्य कुरुप उंच बुटका बारीक जाड त्याच्यापुढे असते समान जैसे कर्म केले तेचि भोगा आले हा कर्माचा सिद्धांत घ्यावा समजून मी मी आणि तू तू करण्यात येते जन्माला आपत्ती मान सन्मान पैसा संपत्ती पद क्षणाचै असतात सोबती लोभामुळे माणूस जातो  काळाच्या जबड्यात लवकर स्वार्थी मन माणसाला सुखापासून ठेवते मात्र दूर कोणतेही कर्म करतांना काळाचे नेहमी स्मरण करावे सतत जागृत राहून माणसाने सत्याला कधीच न विसरावे येतो माणूस एकटा जातोही एकटाच शेवटी असते जीवनाची शून्य बाकी काहीही घेऊन आलेला नसतो जातांनाही नसतो नेत काही दगा देवरे सर