विचार विचार हे मनाचे खाद्य आहे जसे विचार मनाला पुरवणार तसे मन बनते .एकातांत असतांना मनात विचारांचे काहूर माजते ते विचार बहुत करुन विकारांना जन्म देतात.आपल्या मनात विकार निर्माण करणारे विचार जास्त येत असतात व त्यावर जर मात केली नाही तर ते आपल्याला अधोगतीला नेतात जसे पाणी नेहमी उतार्याकडेच धावते व चढत्या बाजूला न्यायचे असेल पाणी तर मात्र मोटर इंजिनचा वापर करावा लागतो म्हणजे साधनांचा वापर केल्यानेच पाणी चढत्याकडे जाते पण साधनांचा वापर न करता पाणी सहजच उतार्याकडे धाव घेते त्याचप्रमाणे विकारांकडे धाव घेतांना मनात कोणतेही कष्ट न करता विचार येतात व त्यावर दाबा ठेवणे फार अवघड असते जर दाबा ठेवण्याची कला नसेल तर ते विचारआपल्याला रसातळाला नेतात पण बिनविकारी बनायचे असेल तर तो चढता मार्ग आहे सहजा सहजी बनने अशक्य असते तेव्हा संतानी साधनांचा वापर सांगितला आहे त्या साधनांचा वापर केला तर विकारी विचारांना थांबवता येते .जेव्हा विकारी विचार येतात तेव्हा थोडे मन शांत करण्याचा प्रयत्न करावा जसे मन शांत करण्याचा प्रयत्न करणार तेव्हा ते अधिकाधिक विकारी विचार मनात येतात व मन बंड ...